
महाराष्ट्राचा केशर आंबा निघाला लंडनला
मुंबई ः हापूसनंतर खवय्यांचे विशेष प्राधान्य असलेला महाराष्ट्र केशर आंबा जेएनपीटी बंदरातून लंडनला समुद्रमार्गे रवाना झाला. एपीएमसीच्या फळ बाजारातील व्यापार्यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला तर रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या युरोपमधील निर्यातीला चाांगला वाव मिळणार आहे.
एपीएमसीच्या फळ बाजारातील एका व्यापार्याने चार हजार डझन केशर आंबा लंडनला पाठवला. हा आंबा पाठवण्यासाठी सी.ए. कंटेनरचा वापर करण्यात आला आहे. या कंटेनरमध्ये आंबा व्यवस्थित ठेवण्यासाठी विशिष्ट वातावरण तयार केले जाते. जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे निघालेला हा आंबा २३ दिवसांच्या प्रवासानंतर लंडनच्या बंदरात पोहचणार आहे.