रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी येत्या वर्षभरात विमानसेवा सुरु होणार-खासदार विनायक राऊत

कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. काही पर्यटन केंद्रे विकसित करण्यावर भर दिला जात आहे. निधीही मंजुर करण्यात आला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी येत्या वर्षभरात विमानसेवा सुरु होणार असल्याचे सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.देवरुख येथे लोकनिर्माण हिरकणी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
राऊत म्हणाले , रत्नागिरी विमानतळासाठी वाढीव जागा हवी होती ती आता मिळाली आहे.यामुळे आता या कामाला गती येणार आहे.वर्षभरात ही विमानसेवा सुरु होईल असे ते म्हणाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button