उंटावरून शेळ्या हाकाणारा हा मुख्यमंत्री नाही तर जनतेच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा हा मुख्यमंत्री -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उंटावरून शेळ्या हाकाणारा हा मुख्यमंत्री नाही. जनतेच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा हा मुख्यमंत्री आहे. त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला असता तर आता जनसंवाद यात्रा काढण्याची वेळ आली नसती, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.रामदास कदम यांनी आपल्या भाषणातून व्यथा आणि वेदना व्यक्त केल्या, त्या खऱ्या आहेत. आज आम्हाला हा निर्णय का घ्यावा लागला असे सांगत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल रामदास कदम जे बोलले ती वस्तुस्थिती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, आम्ही शिवसेना भाजपा युतीमध्ये निवडून आलो सरकार युतीचे व्हायला पाहिजे होते, पण स्वतःच्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंनी तसे केले नाही, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी सुनावले. शिवसेनाप्रमुखांचे आम्हाला शिकवण आहे की अन्याय विरुद्ध पेटून उठा अन्याय सहन करू नका. तेच विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button