अळंबी खाल्ल्याने विषबाधा झालेले आठ जणाची तब्बेत सुधारली

चिपळूण तालुक्यातील कोकरे येथे अळंबी खाल्ल्याने आठ जणांना विषबाधा झाल्याने तातडीने कामथे उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर डॉ. कस्तुरी दाभोळकर यांनी यशस्वी उपचार केले. काल त्या सर्व रूग्णांना बरे झाल्यावर घरी सोडण्याच्या हालचाली सुरू होत्या. कोकरे येथे वासंती लिबे, विश्‍वनाथ दळवी, सुयोग दळवी, मनिषा जाधव, तुकाराम घाणेकर, प्रदीप दळवी, वैभव दळवी, वैशाली दळवी हे भात लावणीचे काम करीत असताना अळंबीची भाजी खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली होती. त्यांना कामथे उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ. कस्तुरी दाभोळकर यांनी तात्काळ उपचार सुरू केल्याने त्यांची तब्बेत सुधारली आहे.
konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button