
कोकणात नारळ लागवडीकडे दुर्लक्ष: राजाभाऊ लिमये
रत्नागिरी: कोकणात नारळ उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर वाव आहे. बारमाही उत्पन्न देणारे पिक म्हणून नारळाकडे पाहिले जाते. परंतु अजूनही नारळ लागवडीकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत नारळ बोर्डाचे माजी उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी जागतिक नारळ दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. रत्नागिरी जिल्ह्यात ५ हजार हेक्टर क्षेत्रावर नारळ लागवड झाली असली तरी त्या ठिकाणी अजूनही मोठे क्षेत्र नारळ लागवडीसाठी उपलब्ध आहे. नारळ बोर्डाकडून मिळालेल्या अनुदानाचा फायदा नगर, सांगली, औरंगाबाद येथील बागायतदारांनी घेतला मात्र कोकणातून त्याला विशेष प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नारळ लागवडीला चालना मिळावी यासाठी कृषि विभागाकडून प्रचार व प्रसारावर भर देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
www.konkantoday.com