
नाट्यप्रयोगातून मिळालेल्या नफ्यातून भातगाव तिसंग नं. २ शाळेला मदत
पंचऋषी सहकार मंडळ भातगाव तिसंग वाडीच्या वतीने सादर केलेल्या “उंबरठा होता साक्षीला” या नाट्य प्रयोगातून मिळालेल्या नफ्यातून जिल्हा परिषद भातगाव तिसंग न. २ शाळेला साउंड सिस्टीम वितरण करण्यात आली.
या प्रसंगी प्रदीप कदम, कोसबी ग्रामपंचायत सरपंच सौ. संचिता सचिन डिंगणकर, कोसबीवाडी तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश वेले, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सौ. श्रावणी संदीप वेले, पंचऋषी उन्नती मंडळाचे अध्यक्ष यशवंत डिंगणकर, उपाध्यक्ष रमेश वेलोंडे, नंदकुमार कदम, मनोहर कदम, मंगेश कदम, विजय कदम, प्रकाश महाकाळ, वाडीतील ज्येष्ठ शांताराम डिंगणकर, तानाजी डिंगणकर, रघुनाथ वेलोंडे, कृष्णा वेलोंडे, मंडळाचे सचिव अनंत डिंगणकर, सहसचिव प्रमोद वरवटकर, खजिनदार काशीराम डिंगणकर, सल्लागार सुभाष फावरे, मुख्यापक वसीम शेख, परशुराम डिंगणकर, प्रकाश वरवटकर, मंगेश डिंगणकर, सुरेश डिंगणकर, सुभाष वेलोंडे, प्रकाश वेलोंडे, रवींद्र वरवटकर, विनोद डिंगणकर, विश्वास डिंगणकर, विश्वास फावरे, मारुती वेलोंडे, सचिन डिंगणकर, राकेश वेलोंडे, संतोष वेलोंडे, अशोक वेलोंडे, विकास वेलोंडे आणि विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी मंडळाचे सचिव अनंत डिंगणकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सर्व मान्यवरांच्या व वाडीतील ग्रामस्थांच्या हस्ते शाळेचे मुख्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांना साउंड सिस्टीम वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी सचिव अनंत डिंगणकर यांनी मंडळाच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. फेब्रुवारी २०२५ रोजी शिवाजी नाट्यमंदिर (दादर) येथे नाट्यकृती सादर केली होती. नाट्यकृती सर्वांच्या सहकार्यने हाऊसफुल्ल झाली. त्या नाट्यकृतीतून मिळालेल्या नफ्यातून जिल्हा परिषद शाळा भातगाव तिसंग शाळेला साउंड सिस्टीम देण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड वाटप आले. मंडळाचे उपाध्यक्ष रमेश वेलोंडे यांनी सर्व विद्यार्थी यांना चांगले शिक्षण घेण्याचे उच्च शिक्षण, उच्च नोकरी आवाहन केले. व विद्यार्थ्यांनसाठी मंडळ सतत खंबीरपणे उभे राहिल, असे आश्वासन दिले.
सरपंच सौ. संचिता डिंगणकर यांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या. नंदकुमार कदम, प्रकाश वेले, मनोहर कदम या सर्वांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी मंडळाला शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना विविध विषयांवर कथेच्या स्वरूपात उदाहरण देत उच्च विचार, उच्च शिक्षण, उच्च नोकरी मिळवण्यासाठी व गावात नवीन नवीन उद्योग उभे करून गावातील लोक गावात राहावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे आणि शाळेचा पट वाढविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत डिंगणकर यांनी केले.




