रेल्वे प्रशासनाने गणपती स्पेशल गाड्यांची घोषणाच नं केल्यामुळे चाकरमान्यांच्यात चलबिचल.

गणेशोत्सवात कोकण मार्गावरून धावणार्‍या नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमान्यांना आतापासून गाव गाठण्याची चिंता सतावत आहे. अजूनही रेल्वे प्रशासनाने गणपती स्पेशल गाड्यांची घोषणाच नं केल्यामुळे गणेशभक्तांचे लक्ष रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे. चाकरमान्यांना. आता गणपती स्पेशल गाड्यांवर अवलंबून अवलंबून राहावे लागणार आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी जादा गणपती स्पेशल जाहीर करण्याची मागणी चाकरमान्यांसह प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. गत महिन्यात आरक्षण सुविधा सुरू होताच अवघ्या दीड मिनिटातच कोकण मार्गावरून धावणार्‍या तुतारी एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, सुपरफास्ट कोकणकन्या एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस, मुंबई-मंगळूर या एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले. गाड्यांची आसन क्षमता संपताच ’रिग्रेट’च्या शेर्‍याने चाकरमान्यांची कोंडी झाली आहे.कोकणात गणपतीसाठी जाणारे चाकरमानी सर्वप्रथम नियमित गाड्यांचे आरक्षण करत असल्याने या गाड्या आधीच फुल्ल होतात. चाकरमान्यांसमोर दुसरा पर्याय असतो विशेष गाड्यांचा. प्रशासनाकडून विशेष गाड्यांची अजूनही घोषणा झालेली नाही.. रेल्वे प्रशासनाने गणपती स्पेशल गाड्यांच्या फेर्‍या जाहीर केल्यास नियमित गाड्यांच्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना आरक्षण करून गावी येण्याचा मार्ग सुकर होईल, असा सूर गणेशभक्तांकडून आळवला जात आहे. मध्य व कोकण रेल्वे प्रशासन गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा नेमकी कधी करते, याचीच चाकरमान्यांना उत्सुकता आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button