
राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील व्यापारी संकुलाला रात्री दीड वाजता दुकानांना भीषण आग,सात दुकाने जळून खाक लाखो रुपयाचे नुकसान
मच्छीमारीचे मोठे केंद्र असलेल्या राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील व्यापारी संकुलाला रात्री दीड वाजता दुकानांना भीषण आग लागली. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केले या भीषण आगीत व्यापारी संकुलातील सात दुकाने जळून खाक झाली.आगीवर स्थानिक ग्रामस्थ आणि राजापूर अग्निशामक दलाच्या माध्यमातून नियंत्रण मिळवण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांकडून खाजगी गाड्यांनी पाण्याची व्यवस्था करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. व्यापारी संकुलात असलेल्या दुकान गाळ्यातील सामान आणि दुकान गाळे जळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप कळलेले नाही मात्र दुकाने जळल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे