
देशात लवकरच रोपवे केबल बसेस सुरू करण्यात येणार
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी भारतातील वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहेदेशात प्रदूषणमुक्त वाहतूक वाढवण्यासाठी आणि जीवाश्म इंधनावरचा अवलंब कमी करण्यासाठी त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
पुढील पाच वर्षांत जैवइंधनाचा वापर ५०% पर्यंत वाढवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑटोमोबाईल उद्योगाला पर्यायी इंधनांवरील संशोधनाला गती देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने देशात लवकरच रोपवे केबल बसेस सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही गडकरी यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात लवकरच रोपवे केबल बस सेवा सुरू होणार असून, या सेवेत मर्यादित अंतरावर स्टेशन्स उभारले जातील, जिथून प्रवासी चढ-उतर करू शकतील. विशेष म्हणजे हे संपूर्ण बस नेटवर्क पर्यावरणपूरक आणि बॅटरीवर चालणारे, म्हणजेच इलेक्ट्रिक असणार आहे.देशातील विविध शहरांमध्ये अशा 60 हून अधिक केबल बस प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय 360 नवीन प्रस्ताव सरकारकडे आले असून, त्यांच्यावरही सकारात्मक विचार केला जाणार आहे.
त्यामुळे लवकरच देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये ही आधुनिक, प्रदूषणमुक्त आणि कार्यक्षम बस सेवा प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पासाठी अमेरिका, युरोप आणि जपानमधून 13 तांत्रिक प्रस्ताव प्राप्त झाले आहेतया प्रकल्पाची सुरुवात देशाच्या राजधानी दिल्लीत होणार असून, पहिली रोपवे केबल बस दिल्लीत धावणार आहे. त्यानंतर मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्येही ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.या वातानुकूलित रोपवे केबल बसमध्ये एकावेळी 135 प्रवासी बसू शकतात. प्रवाशांसाठी हवेतच चहा-पाण्याची सुविधाही उपलब्ध असणार आहे, जे या सेवेचं एक खास आकर्षण ठरेल. विशेष म्हणजे या बस केवळ 30 सेकंदांत चार्ज होऊ शकतात, आणि प्रवाशांना प्रीमियम दर्जाचा अनुभव देणार आहेत.