
भाटे किनाऱ्यावर मत्स्य प्रेमींना मिळाली मुळ्यांची बंपर लॉटरी, रत्नागिरीकर मारत आहेत मुळ्यांवर ताव
पावसाळा सुरू झाल्याने एक जून पासून शासनाने मच्छीमारीवर बंदी घातल्याने यांत्रिकी मच्छीमारी नौकांची मच्छीमारी बंद असते त्यामुळे मत्स्यप्रेमीचा कुरल्या ,शिंपल्या व खाडीतील मासे यांच्यावर जोर असतो त्यामुळे त्यांचा भाव वाढलेला असतो परंतु काल मत्स्यप्रेमींना भाटे किनाऱ्यावर मुळ्यांची बंपर लॉटरी लागली
रत्नागिरी शहरानजीक भाट्ये येथे बंपर मुळे (शिंपले) मिळत असल्याची कोण कुण मत्स्यप्रेमींना लागली दोन दिवसात या भागात मोठ्या प्रमाणावर मुळे किनाऱ्यावर मिळत असल्याचे लक्षात आल्यावर लोकांनी तिकडे धाव घेतली काल तर नागरिकांनी या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने धाव घेतली त्यामुळे किनाऱ्याला जत्रेचे स्वरूप आले होते कोणी धावत तर कोणी दुचाकी घेऊन तर कोणी चार चाकी घेऊन भाटे समुद्रकिनाऱ्यावर आले आणि प्रत्येकाने हे मुळे गोळा करायला सुरुवात केली अनेक जणांनी पोती भरून मुळे गोळा केले मुळे मिळत असल्याचे पाहून छोट्या होडक्या ही किनाऱ्यावर आल्या एकूणच भाटे किनाऱ्यावर अचानक मोठी गर्दी जमा झाल्याने सगळ्यांचे लक्ष वेधले गेले त्यामुळे भाटे पुलावर देखील बघ्याचीच गर्दी होऊन वाहनांच्या रांगांच्या रांगा लागल्या
शेवटी पोलिसांनाही किनाऱ्यावर धाव घ्यावी लागली पोलिसांना हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणल १ जूनपासून मच्छीमारी बंद झाल्याने खवय्यांचा हिरमोड झाला होता; मात्र गेले दोन, तीन दिवस भाट्ये किनाऱ्यावर मिळणाऱ्या मुळ्यांनी खवय्ये खुश झाले असून, आता ते दोन दिवस मुळ्यांवर ताव मारीत आहेत