
नदीतील बंधाऱ्यावरून पलीकडे असलेल्या दत्त मंदिरात जाणाऱ्या तरुणीचा पाय घसरून नदीत पडल्याने नदीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू.
नदीतील बंधाऱ्यावरून पलीकडे असलेल्या दत्त मंदिरात जाणाऱ्या तरुणीचा पाय घसरून नदीत पडल्याने नदीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आंजणारी मठ येथील काजळी नदीत आज शनिवारी दुपारी ११.४५ वाजण्याच्या सुमाराला घडली आहे.मुळची लांजा तालुक्यातील कोडगे गावची रहिवासी असलेली आणि सध्या मुंबई बोरिवली येथे राहणारी अनुष्का अनिल चव्हाण( वय १९ वर्षे ) ही आपल्या लांजा तालुक्यातील पुनस कोंड येथील आपल्या मामाच्या गावी आली होती .आज शनिवारी मामाची मुले आणि अनुष्का ही अंजनारी येथील काजळी नदी किनारी असलेल्या दत्त मंदिर या ठिकाणी चालले होते या ठिकाणी रत्नागिरी एमआयडीसी ने बंधारा बांधला असून या बंधाऱ्यावरून चालत पलीकडे असलेल्या दत्त मंदिरात जाण्यासाठी अनुष्का जात असताना तिचा पाय बंधारावर घसरला आणि ती नदी पडलीअनुष्का हिला पोहता येत नसल्याने नदीतील पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर ती सुमारे शंभर फूट वाहत गेली नदीतील पाण्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर तिला पाण्यातून बाहेर काढण्यात आले या दुर्दैवी घटनेने पुनस कोंड तसेच कोंडगे परिसरातून हळहळ व्यक्त केले जात आहे