भारतीय जनता पार्टी रत्नागिरी आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न.

भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराध्यक्ष श्री.परशुराम(दादा)ढेकणे.आयोजित, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धा बक्षीस समारंभ व शहरातील शाळांमधील 10वी.बोर्ड परीक्षेत गुणवंत विद्यार्थी तसेच शहरातील सर्व ज्युनियर कॉलेज मधील 12वी. बोर्ड परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जिल्हाध्यक्ष श्री.राजेशजी सावंत साहेब व कोकण पदवीधर विधान परिषद आमदार श्री.निरंजनजी डावखरे साहेब, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.वर्षाताई ढेकणे,पदवीधर आघाडी संयोजक श्री.मनोज पाटणकर साहेब.यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. 10वी/12वी मिळून एकूण 70 विद्यार्थी व पालक या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते. शिर्के प्रशालेचे शिक्षक श्री.राजेश आयरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल माहिती आणि पुढील शैक्षणिक वाटचाल विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निलेश आखाडे यांनी केले. या कार्यक्रमाला महिला शहराध्यक्ष सौ.पल्लवीताई पाटील,सौ. संगीताताई कवितके, सौ. सायलीताई बेर्डे,श्री.संदीप(बाबू)सुर्वे,श्री. नितीन जाधव,श्री.सचिन गांधी, श्री.मंदार खंडकर,श्री.शैलेश बेर्डे. उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button