
राजापूर तालुक्यातील शिक्षक नियुक्तीसंदर्भातील समस्या सोडवा -माजी आमदार राजन साळवी.
राजापूर तालुक्यातील काही शाळांमध्ये शून्य शिक्षक आहेत. काही शाळांमधील शिक्षकांना कामगिरीवर काढण्यात आले आहे. मात्र त्यांचा पगार मूळ शाळेमधूनच होतो. प्रत्यक्षात शिक्षक त्या ठिकाणी नसतो. त्यामुळे कंत्राटी शिक्षकही त्या शाळेवर नियुक्त करता येत नाही. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो. त्यामुळे राजापूर तालुक्यातील शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात निर्माण होणार्या समस्या सोडवाव्यात, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा माजी आमदार राजन साळवी यांनी दिला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्ते, सरपंच काही शाळांमधील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्यासह माजी आमदार राजन साळवी यांनी शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली.www.konkantoday.com