ज्यांनी बालवाडी काढली नाही त्यांना संस्था उभी कशी करायची कळणार कसे?

ज्याने साधी बालवाडी काढली नाही, त्यांना संस्था उभी कशी करायची आणि ती कशी चालवायची, हे काय माहित असणार, अशा टीका करणार्‍यांकडे लक्ष देवू नका, विचलित होवू नका, असे प्रतिपादन करीत आमदार शेखर निकम यांनी माजी आमदार रमेशभाई कदम यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. खेर्डी येथे मंगळवारी महायुतीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते.कधी साधी बालवाडी ज्यांनी सुरू केली नाही. त्यांनी संस्थेविषयी बोलणे हे हास्यास्पद आहे. शेखर निकमला मत म्हणजे भाजपला मत असे ते सांगत आहेत. मात्र तुम्ही भाजपमध्ये होतात, भाजपमध्ये का गेलात, हेही सर्वांना ठावूक आहे. मात्र तत्कालीन नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी तुमची डाळ शिजू दिली नाही. त्यामुळे पुन्हा इकडे आलात, हेही चिपळूणची जनता जाणून आहे, असेही आमदार शेखर निकम म्हणाले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button