तिवरे धरण मृत्यूप्रकरणी वारसांना दहा लाखांची मदत करावी ः शौकतभाई मुकादम

चिपळूण ः तिवरे धरणात मृत्यू पावलेल्या कुटुंबियातील लोकांना शासनाने दहा लाखांची मदत जाहीर करावी, अशी मागणी शौकतभाई मुकादम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तिवरे येथील शासनाच्या अधिकार्‍यांच्या हलगर्जिपणामुळे धरण फुटले. यामध्ये अनेक लोक मृत्यूमुखी पावले आहेत. कोकण हा डोंगराळ भाग आहे याचा विशेष निकष लावून मृत झालेल्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत जाहीरर करावी, अशी मागणी पं. स. सभापती शौकतभाई मुकादम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यानी लाख जाहीर केलेली आहे. कोकणच्या भौगोलिक दृष्टीचा विचार करून दहा लाख रुपयांची मदत करणे आवश्यक आहे, असेही मुकादम यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button