रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यात एक दिवसाचा दुखवटा,शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार


ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर वरळीतील माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रतन टाटा यांच्या निधानानंतर राज्यात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे.त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रतन टाटा यांचे अधिकृत निवासस्थान कुलाब्यातील सॉमरसेट हाऊस इथं आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांचं पार्थिव निवासस्थानी आणण्यात आलं आहे.राज्यात शासकीय दुखवटा
रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा असणार आहे. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेतदिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजे पर्यंत नरीमन पॉईट येथील NCPA सभागृहात अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळी येथील माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशान भूमी मधील पारसी प्राथना सभागृहातील विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button