रत्नदुर्ग किल्ल्यावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळा संरक्षणासाठी पोलिसांची नियुक्ती करा, राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ला येथे उभारण्यात येणार्‍या शिवसृष्टीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या २४ फूट उंच पुतळ्याच्या संरक्षणासाठी पोलीस, सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्हीचे नियोजन करण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर व शहर अध्यक्ष निलेश भोसले यांनी केली आहे. याबाबतचे निवेदनही रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना देण्यात आले आहे.रत्नदुर्ग किल्ल्याजवळ शिवसृष्टी प्रकल्प पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आले आहे. या शिवसृष्टीचे ४ ऑक्टोबर रोजी लोकार्पण होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प साकारला जात आहे. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा २५ फूट उंच पूर्णाकृती पुतळा आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी या शिवसृष्टीच्या उभारणीसाठी १७ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button