
माचाळ गावात पर्यटकांची संख्या वाढली
जीवितहानीसारख्या दुर्घटनांमुळे लांजा तालुक्यातील धरण, धबधब्यांवर जाण्यासाठी शासकीय यंत्रणेने बंदी घातली आहे. त्यामुळे मिनी महाबळेश्वर समजल्या जाणार्या माचाळ गावी वर्षा पर्यटन सहलीसाठी येणार्यांची संख्या विकेंडला सर्वाधक होत आहे.समुद्र सपाटीपासून सर्वाधिक उंचीवर असलेल्या लांजा तालुक्यातील माचाण गावी जाण्यासाठी थेट रस्ता झाल्याने पर्यटकांना अधिक सोयीचे झाले आहे. पावसाळ्यात माचाळ गावचे सौंदर्य अधिकच फुलत असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने हे गाव अधिक लक्षवेधी ठरले आहे. नैसर्गिक संपत्ती पर्यटकांसाठी आल्हाददायक ठरत आहे.www.konkantoday.com