
चिपळूण बाजारपेठेतील व्यापार्यांनी केलेले अतिक्रमण नगर परिषद दोन दिवसात काढणार
चिपळूण बाजारपेठेतील गटारांवर कडाप्पे व लेंटर टाकून काही व्यापार्यांनी केलेले अतिक्रमण नगर परिषद दोन दिवसात काढणार आहे. पावसाचे पाणी सहज वाहून जावे म्हणून ही उपाययोजना केली जाणार असून यामुळे वर्षानुवर्षे झाकून राहिलेली गटारे मोकळी होणार आहेत.शहरातील बाजारपेठेचा विचार करता बहुतांशी व्यापार्यांनी आपल्या दुकानांसमोर असलेल्या गटारांवर कडाप्पे व लेंटर टाकून बंद केली आहेत. त्यामुळे गटारांची साफसफाई करणेही कर्मचार्यांना शक्य होत नसून पावसाचे पाणी गटारांमध्ये न जाता बाजारपेठेत पसरत असल्याचे चित्र दिसून येते. यामुळे अनेक व्यापार्यांचे नुकसान होते. हे नुकसान होवू नये व पावसाचे पाणी नद्यांमध्ये सहज वाहून जावे यासाठी गटारे मोकळी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याला व्यापारी संघटनेने पाठिंबा दिला असून येत्या दोन दिवसात गटारांवरील अतिक्रमण काढण्यास सुरूवात होणार आहे. तर दुकानात जाता यावे यासाठी एखादा कडाप्पा ठेवण्याचीही मुभा दिली जाणार आहे.www.konkantoday.com