लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र आल्यास आश्चर्य मानू नका- प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंसोबत समझोता झाल्याचा दावा, प्रकाश आंबेडकरांनी केलाय. कल्याण लोकसभेत उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार खरंच लढणारा आहे का, असा सवालही आंबेडकरांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र आल्यास आश्चर्य मानू नका, असंही ते म्हणाले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार हा खरंच लढणारा आहे का? एकनाथ शिंदे सोबत समझोता करून झालेला असून लोकसभा निवडणूक नंतर हे दोघे एकत्र आले तर आश्चर्य मानू नका. चर्चा चालू झाली आहे असा खळबळ जनक आरोप आरोप प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत करणार त्यामुळे हे फसवा फसवी चे राजकारण सुरू आहे असं आंबेडकर पुढे म्हणाले. कल्याण लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर उल्हासनगर मध्ये आले होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button