जगबुडीवरील नवा पूल अपघाताचे ठिकाण ठरतेय

मुंबई-गोवा महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंतच्या चौपदरीकरणामुळे वाहनचालकांचा प्रवास सुसाट झाला असला तरी भोस्ते घाटातील अवघड वळणापाठोपाठ भरणे येथील नवा जगबुडी पूलही अपघाताच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरत आहे. यामुळे वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. पुलाचीही नासधूस होत असून राष्ट्रीय महामार्ग खाते अजूनही सुस्तच असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.महामार्गावरील चौपदरीकरणामुळे वाहनचालकांचा प्रवास वेगवान झाला. तरी भोस्ते घाटातील अवघड वळणावर सातत्याने घडणार्‍या अपघातामुळे वाहनचालकांचा जीव टांगणीवर आले. या वळणावर विशेषतः अवजड वाहनांना घडणारे, अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने नवनव्या क्लुप्त्या अवलंबूनही सारे प्रयास फोल ठरले असून अपघातांची मालिका सुरूच आहे. अपघात रोखण्यासाठी बसवलेले १६ गतिरोधकही कुचकामी ठरले आहेत. याशिवाय अपघात टाळण्यासाठी संरक्षक भिंतीवर करण्यात आलेला टायर तंत्रज्ञानाचा अवलंबही फोल ठरला आहे. तसेच जगबुडी पूलही अपघाताचे ठिकाण ठरत असल्याने याबाबत संबंधितांकडून कार्यवाही होणे गरजेचे आहे www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button