
स्वच्छतेची सुरवात आपल्या स्वतःच्या घरापासून करा-पर्यावरण अभ्यासक प्रशांत परांजपे
_आपल्या घराला कचरामुक्त करण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेऊन ‘जिच्या हाती स्वच्छतेची दोरी ती जगासी उद्धारी’ या न्यायाने पदर खोचून निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाकरिता पुढे येणं काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक प्रशांत परांजपे यांनी केले.भरारी बचतगट महासंघ दापोलीतर्फे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सहयोगाने कृषी महाविद्यालय सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. प्रदीप हळदणकर, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. जगदीश कदम, डॉ. संतोष वरवडेकर, भरारी बचतगट महासंघ अध्यक्ष शैला अमृते, उपाध्यक्ष रेश्मा झगडे उपस्थित होते.या वेळी परांजपे म्हणाले, स्वच्छतेची सुरवात आपल्या स्वतःच्या घरापासून करा. सर्व प्रकारचा सुका कचरा निवेदिता प्रतिष्ठानच्या संकलन केंद्रात जमा करा आणि ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खत करा आणि आपल्या ‘घरावर कचरामुक्त घर’, अशी पाटी अभिमानाने लावा. त्याकरिता सर्वतोपरी सहकार्य आम्ही करू.www.konkantoday.com