
रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणीयोजनेच्या खोदण्यात आलेल्या चरानी नागरिकांना व नगरपरिषदेला दमविले
रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा व्हावा यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणी योजनेच्या कामाच्या दर्जाबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत सुरुवातीच्या काळात अनेक भागात मोठी वाहने चिखलात रुतून राहण्याचे वारंवार प्रकार घडत होते पावसाळ्यात देखिल या चरामुळे अनेक खड्डे निर्माण झाले हाेते याशिवाय पाणी योजना पूर्ण याआधीच अनेक ठिकाणी या पाईपलाईन फुटण्यास सुरुवात झाली त्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्यानंतर नळपाणी योजना राबविताना चर बुजवण्याचे काम योग्य प्रकारे झाले नसल्याने डांबरीकरण केलेल्या भागालातही खड्डे पडले होते आता जयस्तंभ कडून तेली आळी कडे जाणार्या रस्त्यावरदेखील असाच मोठा खड्डा पडला आहे असे खड्डे वारंवार तात्पुरते बुजवून रत्नागिरी नगरपरिषदेतील यंत्रणा दमली आहे तर नागरिकांचीही अशाप्रकारे खड्डे चुकवताना दमछाक होत आहे
www.konkantoday.com