
कोकणात गणेशोत्सावासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आमदार आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांकडे धरला हा आग्रह
कोकणात गणेशोत्सावासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अधिकच्या विशेष गाड्या सोडाव्यात, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी नवे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना केली आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या ७२ विशेष रेल्वे गाड्या फुल झाल्या असून रेल्वेने अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी पुणे दौऱ्यात रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन ही मागणी केली
गणेशोत्सवाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या कोकणातील गावी जातात. यावर्षी कोकण रेल्वे ने ७२ अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली. तसेच बुकिंग सुरू होताच त्यांचे बुकिंग पुर्ण क्षमतेने होऊन बरेचजण अद्याप प्रतिक्षा यादीतच आहेत, याकडे शेलार यांनी नव्या रेल्वे राज्य मंत्र्यांचे लक्ष वेधले.
दरवर्षीच्या तुलनेत या गाड्या कमी असून २०१९ ला कोकण रेल्वेवर २१० फेऱ्या व रेल्वे गाड्यांना ६४७ अतिरिक्त डबेही जोडले होते. तर त्यावेळी तिकीटांसाठी ज्यादा बुकिंग साठी ११ टपाल खात्यात, १७ रेल्वे स्थानकात पीआरएस सिस्टम आणि १६ ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी आदी सुविधा २०१९ ला खास कोकणवासीयांना उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्यामुळे याही वर्षी अशा अधिकच्या बुकिंग सुविधा व अजूनच्या काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
www.konkantoday.com
