सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे पकडण्यात आलेला रत्नागिरीतील ट्रॉलर बंदरातून पळविला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आचरा समुद्रात वीस वावात शुक्रवारी मत्स्य व्यवसाय खात्याच्या शीतल गस्ती नौकेने पकडलेला रत्नागिरीतील अनधिकृत एलईडीचा ट्रॉलर येथील बंदरातून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
एका मोठ्या राजकीय नेत्याच्या कनेक्‍शनमुळेच एलईडीचा ट्रॉलर पळवविला असल्याचा आरोप भाजपचे कार्यकर्ते रविकिरण तोरसकर यांनी केला आहे. ते म्हणाले, “याविरोधात सोमवारी मत्स्य व्यवसाय अधिकारी, तहसीलदार, पोलिसांना जाब विचारणार आहे.”भाजप कायमच अनधिकृत मासेमारीच्या विरोधात आहे. विशेषतः परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर व एलईडी मासेमारीच्या अतिक्रमणाबद्दल संवेदनशील आहे. पळवून नेलेला ट्रॉलर रत्नागिरी येथील असून, त्या मागे कुणाचा आशीर्वाद आहे, हे सर्वांसमोर आले पाहिजे. यापुढे पकडून आणलेला ट्रॉलर सुरक्षित ठेवण्यासाठी भाजप चौकस राहणार आहे. अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे भाजपचे विशेष पथक मत्स्य व्यवसायबरोबर कार्यरत राहणार आहे.”
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button