
तर त्या परीक्षा लेखी परीक्षेनंतर घेण्यात येतील -शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांना नियोजित वेळापत्रकानुसार प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा देणे शक्य न झाल्यास, त्या परीक्षा लेखी परीक्षेनंतर घेण्यात येतील, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. मात्र, गरज भासल्यास लेखी परीक्षेनंतर घेण्यात येणाऱ्या या परीक्षांसाठी वेगळे शुल्क आकारले जाऊ नये, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाकडून काही निर्बंध घालण्यात येत आहेत.
www.konkantiday.com