वनविभागाने सर्व यंत्रणा राबवूनही मेर्वी परिसरात बिबट्याचा वावर सुरु, वनविभाग यंत्रणा हैराण

रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी परिसरात माणसांवर हल्ले करणारा बिबट्या अजूनही वनविभागाच्या तावडीत सापडत नसल्याने वनविभागाचे कर्मचारी हैराण झाले आहेत बिबट्याला पकडण्यासाठी विविध भागातून पथके येऊनही बिबट्या वनविभागाला हुलकावणी देत आहे बिबट्याने पंधरा दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्यास सुरवात केली आहे. चरण्यासाठी गेलेल्या एका गायीला बिबट्याने फस्त केल्याने बिबट्याने पुन्हा एकदा वनविभागासमोर आव्हान उभे केले आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबईतून बिबट्याला पकडण्यासाठी दुसर्‍यांदा आलेले पथक बिबट्याला पकडू न शकल्याने माघारी गेले आणि बिबट्याने पुन्हा आपला हिसका दाखवला. पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मेर्वी खालची म्हादयेवाडी येथील अमोल अनंत मांडवकर यांच्या गायीवर हल्ला करून तिला ठार मारले. या परिसरात वनविभागाची गस्त रस्त्यावर सुरू आहे. पण शुक्रवारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या आणि प्राण्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बिबट्या अद्याप पिंजरा व कॅमेर्‍यातही कैद होत नसल्याने वनविभाग हैराण झाला आहे. पावस परिसरात वनविभागाने जनजागृती सुरू केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button