
भरतीमुळे रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनारी रत्नसागर बीच रिसॉर्ट मधील 35 नारळाच्या झाडाचे नुकसान
भरतीच्या वेळी भाट्येकिनारी समुद्राचे अतिक्रमण झाले असून त्यात किनाऱ्यावरील रत्नसागर बीच रिसॉर्टच्या 35 नारळाच्या झाडांचे नुकसान झाले आहे. समुद्र तीन मीटर आत घुसला असून अर्धा किलोमीटर भागाची धूप झाली आहे. भविष्यात चाळीस नारळाच्या झाडांना धोका असून सलग दुसऱ्या वर्षी पावसाळ्यात भाट्ये किनाऱ्यावर हा प्रकार घडला आहे
भाट्ये किनाऱ्यावर झरीविनायक मंदिराच्या बाजूला रत्नसागर बीच रिसॉर्टमध्ये नारळासह विविध झाडे लावण्यात आली आहेत समुद्राच्या भरतीमुळे त्यातील काही झाडांचे नुकसान झाले आहे
www.konkantoday.com