
प्रवासी क्षमतेने सुरू करण्यासाठी दोन आसनांदरम्यान प्लास्टिक तावदाने बसविण्याचा एसटी महामंडळाचा विचार
सध्या एसटी ५० टक्के प्रवासी क्षमतेने धावत आहे. ती पूर्ण प्रवासी क्षमतेने सुरू करण्यासाठी दोन आसनांदरम्यान प्लास्टिक तावदाने बसविण्याचा एसटी महामंडळाचा विचार आहे.
टाळेबंदीआधी १८ हजार एसटी बसगाडय़ांतून रोज ६० ते ६५ लाख जण प्रवास करत होते. त्यामुळे महामंडळाला रोज सुमारे २२ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. टाळेबंदीत एसटीची सेवा बंद झाली आणि उत्पन्नच बुडाले. नुकतीच टप्प्याटप्यात एसटीची जिल्हांतर्गत आणि त्यानंतर आंतरजिल्हा बससेवा सुरू झाली. एसटीतून ४४ ऐवजी २२ प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. त्यामुळे एसटीला केवळ २२ प्रवाशांच्या भाडय़ातूनच उत्पन्न मिळत आहे. त्यातच एसटीला एकाच मार्गावर जास्त एसटीही सोडाव्या लागत असल्याने इंधनाचाही मोठा खर्च येत आहे
www.konkantoday.com