
परराज्यातील मजुरांपैकी आतापर्यंत एकूण ३ लाख १५ हजार६०१ मजुरांना २२० विशेष रेल्वे गाड्यांनी त्यांच्या मुळराज्यात पोहोचविले
कोकण विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या परराज्यातील मजुरांपैकी आतापर्यंत एकूण ३ लाख १५ हजार६०१ मजुरांना २२० विशेष रेल्वेगाड्यांनी त्यांच्या मुळराज्यात पोहोचविण्यात आले आहे, अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे.
कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हयांध्ये अडकलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, कर्नाटक, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमधील नागरीकांना त्यांच्या राज्यात अथवा मुळ निवासस्थानापर्यंत पोहचविण्यासाठी विशेष रेल्वे गाडया सोडण्यात आल्या. आतापर्यंत सोडलेल्या गाड्या व नागरिकांची संख्या अशी ठाणे २० गाडया २५ हजार ९९१ प्रवासी, पालघर २० गाडया ३२ हजार ४३२ प्रवासी, रायगड १७ गाडया २५ हजार ५३ प्रवासी, रत्नागिरी ४ गाड्या ५ हजार ७२ प्रवासी, सिंधुदूर्ग २ गाड्या ३ हजार ९१२ प्रवासींना त्यांच्या मुळ राज्यात मुळ निवासस्थानी पोहचविण्यात यश आले आहे.
www.konkantoday.com