
रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी
रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी या ऑनलाईन याचिकेमधून करण्यात आली आहे. यामध्ये लिहले आहे की, ‘रतन टाटा हे परोपकार आणि मानवतेचे उत्तम उदाहरण आहे.त्यांनी अनेक संशोधनासाठी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था उभारण्यासाठी आर्थिक मदत केली. शिवाय, या याचिकेमध्ये रतन टाटा यांनी मदत केलेल्या सर्व संस्थांची यादी देण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या समाजसेवेची पण यादी देण्यात आली आहे.’एका नेटिझन्सने चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली आहे. जगभरातील नेटिझन्सनी पाठिंबा दर्शविला आहे
www.konkantoday.com