फुलराणी कक्ष” या महाराष्ट्रातील पहिल्यावहिल्या उपक्रमाचे पालकमंत्री उदय सामंत यांचे हस्ते उद्घाटन


पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यालयात राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते “फुलराणी कक्ष” या महाराष्ट्रातील पहिल्यावहिल्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

शालेय विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात अनेक शारीरिक व मानसिक अडचणींना सामोरे जावे लागते. या काळात योग्य सुविधा, स्वच्छता, विश्रांतीची जागा आणि भावनिक आधार मिळणे अत्यंत आवश्यक असते. “फुलराणी कक्ष” संकल्पना या सर्व गरजांची पूर्तता करणारा उपक्रम आहे. या कक्षामध्ये स्वच्छता साहित्य, आरामासाठी जागा, आवश्यक आरोग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, PCOD (Polycystic Ovarian Disease) सारख्या वाढत्या आरोग्य समस्यांबाबत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती निर्माण करून त्यावर योग्य वेळी उपचार मिळवून देण्यावरही भर दिला जाणार आहे.

अनुसया महिला स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये राबविण्याचा मानस असून, यामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होईल, गैरसमज दूर होतील आणि त्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट होईल.

“फुलराणी कक्ष” हा केवळ एक उपक्रम नसून, विद्यार्थिनींच्या आरोग्यदायी, सन्मानपूर्ण आणि सशक्त भविष्यासाठी उचललेले एक संवेदनशील व दूरदृष्टीचे पाऊल आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button