
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरीत निघाला भव्य ‘मूक मोर्चा’
रत्नागिरी: ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि विविध प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी ‘रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियन’तर्फे मंगळवारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चा जिल्हा परिषद कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी या मार्गाने निघाला. या मोर्चात हजारो ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
शिवरे (ता. पारोळा, जि. जळगाव) येथे कर्तव्यावर असताना ग्रामपंचायत अधिकारी स्व. पी. एन. पाटील साहेब यांच्यावर झालेल्या अमानुष हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा एल्गार पुकारण्यात आला.




