
रत्नागिरी शहरातील विकास कामांची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी
रत्नागिरी शहराचा चेहरामोहरा बदलणाऱ्या आणि नागरिकांचे जीवन सुकर करणाऱ्या विविध विकासकामांची आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यामध्ये मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी शहरातील प्रमुख रस्ते, आधुनिक फुटपाथ बांधणी आणि इतर सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला.
त्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सर्व कामे दर्जेदार आणि विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना दिल्या.




