
शासनाकडून विविध विभागांत भरण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाèयांना वेळेवर मानधन नाही, उपासमारीची वेळ !
शासनार्माफत विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यात येत असली तरी संबंधित कर्मचाèयांना महिनाेन महिने मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे वरिष्ठ अधिकाèयांकडून कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी तगादा लावला जात असताना दुसरीकडे तुटपुंजे मानधनही वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाèयांमध्ये नाराजी व्यक्त हाेत आहे.
याेजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी या कर्मचाèयांवर अतिरिक्त कामाचा बाेजाही टाकला जात असल्याचे समाेर आले आहे. ग्रामीण गृहनिर्माण विभागातील डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचे दाेन महिन्यांचे मानधन थकीत आहे. तर स्वच्छ भारत मिशन ग्रामीण पाणी व स्वच्छता विभागातील समूह समन्वयक व गट समन्वयक यांना तब्बल पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. महाराष्ट्र ग्रामीण राेजगार हमी याेजनेतील तांत्रिक सहाय्यकांचे तीन महिन्यांचे मानधन थकीत असून गेल्या चार वर्षांपासून त्यांना प्रवास भत्ताही देण्यात आलेला नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांचे दाेन महिन्यांचे मानधन थकित असून क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनाही गेल्या दाेन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही.
या कर्मचाèयांनी शासनाकडे थकीत मानधन तत्काळ अदा करावे, अशी मागणी केली आहे. वेळेवर मानधन मिळाल्यास कर्मचाèयांना आर्थिक अडचणींना सामाेरे जावे लागणार नाही. हा नियम सरकारच्या अखत्यारीत येणाèया सर्व संस्थांना लागू असेल. यात केंद्र सरकारची सर्व मंत्रालये, त्यांचे विभाग, सर्व क्षेत्रीय कार्यालये, महावितरण मधील बायस्त्राेत कर्मचारी, केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाèया सर्व स्वायत्त संस्था, केंद्रीय क्षेत्रातील उपक्रम आणि राष्ट्रीयीकृत बँका यांच्या समावेश आहेwww.konkantoday.com




