
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे
राज्याच्या इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे पॅकेज
एकूण 31,628 कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीर
मृतांच्या कुटुंबीयांना: 4 लाख प्रत्येकी
जखमी व्यक्तींना : 74,000 रुपये ते 2.5 लाख
घरगुती भांडे, वस्तूंचे नुकसान: 5000 प्रतिकुटुंब
कपडे, वस्तूंचे नुकसान: 5000 प्रतिकुटुंब
दुकानदार, टपरीधारक: 50,000 रुपये
डोंगरी भागात पडझड, नष्ट पक्क्या घरांना : 1,20,000 रुपये
डोंगरी भागात पडझड, नष्ट कच्च्या घरांना : 1,30,000 रुपये
अंशतः पडझड: 6500 रुपये
झोपड्या: 8000 रुपये
जनावरांचे गोठे: 3000 रुपये
दुधाळ जनावरे: 37,500 रुपये
ओढकाम करणारी जनावरे: 32,000 रुपये
कुक्कुटपालन: 100 रुपये
शेतकरी
एनडीआरएफचे निकष: 2 हेक्टर, परंतु त्यापेक्षा अधिकची मदत, 3 हेक्टर
निकषापेक्षा अधिकची मदत देण्यासाठी 10,000 कोटी रुपये अतिरिक्त, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार
खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47,000 प्रतिहेक्टर रोखीने आणि मनरेगाअंतर्गत 3 लाख रुपये प्रतिहेक्टर
खचलेली किंवा बाधित विहीर: 30,000 रुपये
तातडीच्या मदतीसाठी 1500 कोटी रुपये डीपीडीसीत राखीव
शेतकऱ्यांना मिळणार मदत: 48,000 रुपये प्रतिहेक्टर
पीकविमा: अंदाजे 5000 कोटी
दुष्काळी सवलती लागू
जमीन महसुलात सुट
पीक कर्जाचे पुनर्गठन
शेती कर्ज वसुलीला स्थगिती
वीज बिल माफी आधीच
शाळा, कॉलेज परीक्षा शुल्कात माफी
रोहयो कामात शिथिलता
शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे




