रत्नागिरी एसटी विभागात अनेक बसेसचे फलक अस्पष्ट


रत्नगिरी विभागातून पहाटेपासून एसटी बसेस विविध मार्गावर धावतात. शहरी बसेस रत्नागिरी ते हातखंबा, रेल्वेस्टेशन व विविध गावात धावते. या बसेसवरील गावाच्या नावाचे फलक धुसर, अक्षर फिकट झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी, सामान्य प्रवाशांना वाचता येत नाही. तर दुसरीकडे जिल्ह्यांतर्गत राजापूर, लांजा, चिपळूण, रत्नागिरी, गुहागर, देवरूख, संगमेश्वर, दापोली, खेड तालुक्यात एसटी बसेस धावतात.

काही बसेसवरील नावाचे फलक चांगल्या पध्दतीने दिसते तर काही बसेसवर धुसर दिसत आहे. लालपरी लिहलेल्या नवीन बसेसवर ही पांढऱ्या अक्षराचे फलक आहे मात्र तेही धुसर दिसत आहे. काही वाहक तोंडाने गावाचे, तालुक्याचे नाव घेत आहेत. त्यामुळे कित्येक वेळा गाडी चुकते. लांबपल्याच्या एसटी बसेसमध्ये लाल रंगाच्या अक्षरात ठळक नावे दिसते, परंतु काही बसेवरील फलकावरील नावे दिसत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे शहर, ग्रामीण भागातील जिल्हांतर्ग बसेसवरील गाव, शहर, जिल्ह्याच्या नावांची फलक ठळक पद्धतीने नवीन बसवावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button