जिल्हाधिकारी यांचा मनाई आदेश मोडून मोर्चा काढला म्हणून मनसेच्या नेत्यांसह एकशे पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग करून एकत्रित येऊन मोर्चा काढला म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, राज्य उपाध्यक्ष सुनील साळवी, उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत, शहर प्रमुख सतीश राणे, राजू पाचकुडे, विद्यार्थी सेना प्रमुख गुरुप्रसाद चव्हाण, शहर प्रमुख अमोल श्रीनाथ यांचेसह १०० ते १२५कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्य शासनाने लॉकडाउनच्या कालावधीतील वीजबिल माफी करावी या मागणीसाठी पक्षाचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण व इतर कार्यकर्त्यांनी माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे मनाई आदेशाचा भंग करून एकत्रित येऊन घोषणाबाजी देऊन बेकायदेशीर जमाव करून मोर्चा काढला व सध्या कोरोना चा विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असताना ही सामाजिक अंतर न ठेवता आंदोलन करुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button