दुसऱ्या टप्प्यातील ‘अभय’ योजनेला जूनअखेरपर्यंतची मुदतवाढ

_राज्य सरकारने १९८० ते २०२० या कालवधीत दस्तनोंदणीवर कमी मुद्रांक शुल्क भरलेल्यांसाठी आणलेल्या दुसऱ्या टप्प्यातील ‘अभय’ योजनेला जूनअखेरपर्यंतची मुदतवाढ मिळाली आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यातील योजनेत पहिल्या टप्प्यापेक्षा मुद्रांक शुल्क आणि दंडाच्या रकमेत मिळणारी सवलत कमी करण्यात आली आहे.पहिल्या टप्प्यातील योजनेला २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपुष्टात आली. आता दुसऱ्या टप्प्यातील योजनेला सुरुवात झाली आहे. या योजनेत अर्ज करण्यासाठी एका महिन्याची म्हणजे ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मुदत जूनअखेरपर्यंत असणार आहे. १९८० ते २००० आणि २००१- २०२० कालावधीतील दस्तांसाठी दुसऱ्या टप्प्यात मुद्रांक शुल्कावर १०० टक्क्यांऐवजी ५० टक्के सवलत मिळेल. तसेच दस्तांवर असलेल्या दंडात २० टक्केच सवलत मिळणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button