
चिपळूण तालुक्यातील करंबवणे येथील भिले खारभूमी बंधारा अर्धवट झाल्याने योजना संकटात.
चिपळूण तालुक्यातील करंबवणे खाडीलगत असलेल्या भिले जांभुळवाडी खारभूमी विकास योजनेच्या दुरूस्तीसाठी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून एकूण ८३ लाखांचा निधी दोनच वर्षभरापूर्वीच मंजूर झाला होता. मात्र ठेकेदाराने कामे अर्धवट ठेवल्याने ही योजना संकटात सापडली आहे.
उघाडीची झडपे बसवली नसल्याने आणि भरावही अर्धवट असल्याने पावसाळ्यात तोही वाहून जाण्याची चिन्हे आहेत. तसे झाले तर शेकर्यांचा मार्गच बंद होणार असल्याने सध्या शेतकरी भीतीच्या छायेत आहेत.समुद्राच्या भरतीचे खारे पाणी शेतात घुसून होणारे नुकसान टाळण्यासाठी खाडीकिनारी संरक्षक बंधारे बांधून संबंधित क्षेत्र लागवडीयोग्य करण्याच्यादृष्टीने खारभूमी विकास योजना राबवली जात आहे. भिले येथील या योजनेत गावाच्या खाजन जमिनीच्या लगत असलेल्या करंबवणे खाडीला वळसा घालणारा दोन कि.मी. लांबीचा मातीचा बंधारा बांधण्यात आला आहे.www.konkantoday.com