इराणमधून २९० भारतीय विद्यार्थी परतले, आज आणखी विमानं येणार!

* इराण आणि इस्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत इराणमध्ये मोठी जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या संघर्षात किमान ६३९ लोक मारले गेले आहेत, अशी माहिती ह्युमन राईट्स अ‍ॅक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सीने दिली. तर रॉयटर्सने इस्रायलच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तिथे २४ नागरिक मारले गेले आहेत.इराणमधील संघर्ष तीव्र होत असताना भारताने तेथील आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शुक्रवारी रात्री दिल्ली विमानतळावरून इराणहून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एक विमान आले. ज्यात २९० भारतीय विद्यार्थी होते. आजही दोन विमाने आणखी येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button