
आवश्यक त्या परवानग्या नसल्याने रनपार समुद्रात अडकलेल्या ’त्या’ ’बार्ज’चा प्रवास लांबला.
पूर्णगड सागरी हद्दीतील फिनोलेक्स जेटीसमोरील अरबी समुद्रात ४ जून रोजी गोव्यातील वास्को द गामाहून मुंबईकडे जाणारे भले मोठे बार्ज तांत्रिक बिघाडामुळे येथे नांगरून ठेवण्यात आलेय. पण आठवडाभरानंतरही ते बार्ज जाग्यावरच आहे. त्याच्या दुरूस्तीनंतरही पुढील प्रवास आवश्यक असलेल्या परवानगीनंतरच सुरू होणार असल्याचे येथील प्रादेशिक बंदर विभागामार्फत सांगण्यात आले. वास्को द गामा येथून ३ जून २०२५ रोजी ऑईल घेवून मुंबईकडे जाण्यासाठी निघालेले ते बार्ज ४ जून रोजी सकाळी ११ च्या दरम्यान रक्तागिरी येथील फिनोलेक्स जेटीजवळील अरबी समुद्रात आले होते. त्या बोटीत बॅटरी व पाण्याचा पंप यात बिघाड झाला. त्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने ती टग रनपार किनार्यालगत आणून अँकर टाकून उभी करण्यात आल्याचे समोर आले. पण त्याची खातरजमा होईपर्यंत येथील सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली होती. कोस्टगार्डच्या अधिकार्यांनी त्या संशयित बार्जवरील लोकांशी संपर्क साधला असता त्या बार्जचे नाव Aतछघज ५ (र्ढीस), Aतछघज७ (इेरीं), Aतछघज २ (ऊीशवसळपस लरीसश) अशी नावे आहेत.www.konkantoday.com