आरवली येथील ऐतिहासिक गरम पाण्याची कुंडे चिखलाने व्यापली.

पनवेल-कन्याकुमारी सुरू असलेल्या रस्ता चौपदरीकरणाच्या कामाचा फटका सध्या संगमेश्‍वर तालुक्यातील आरवली गावाला बसताना दिसत आहे. आरवली गाव म्हटले की लगेच डोळ्यासमोर येत ते ऐतिहासिक गरम पाण्याची कुंड रस्ता रूंदीकरणाच्या कामामुळे समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळे गरम पाण्याची कुंडे चिखलाने भरून गेली आहेत.सध्या हे ऐतिहासिक ठिकाण चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आले आहे.

आजुबाजूची सगळी ढिगार्‍याची माती या कुंडात वाहून आली आहे. ठेकेदाराने खर त मे महिन्यापूर्वी हे काम तातडीने पूर्ण करण्याची गरज होती परंतु रेंगाळलेल्या कामाचा फटका सध्या गरम पाण्याच्या कुंडाला बसला आहे.गरम पाण्याच्या कुंडावर अनेक लोक दररोज आंघोळ करतात. शिवाय गंधकयुक्त पाणी असल्याने हे पाणी त्वचा विकार दूर होण्यासाठी अनेक लोक स्नानासाठी आवर्जुन घेवून जातात. त्वचा विकारावर अतिशय गुणकारी असलेले गंधकयुक्त पाणी निसर्गतः आरवली येथे उपलब्ध असल्याने या गरम पाण्याच्या कुंडांना विशेष महत्व आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button