
उंची वाढविल्याने कळझोंडी धरणाला धोका होणार नाही, अधिकार्यांचा पंचायत समितीच्या बैठकीत निर्वाळा
रत्नागिरी ः कळझोंडी धरण बांधताना त्याच्या पायामध्ये बदल न करता उंची कमी करण्यात आली होती. ही उंची त्यावेळची लोकसंख्या पाहून ठेवण्यात आली होती. आता लोकसंख्येचा विचार केला तर धरणाची उंची वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे आता जरी धरणाची उंची वाढविली तरी आजुबाजूच्या लोकांना कोणताही धोका होणार नसल्याची ग्वाही पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत पाणी विभागाच्या अधिकार्यांनी दिली. धरणाच्या आराखड्यानुसारच धरणाची उंची वाढविण्यात येणार असून त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. कळझोंडी धरण नादुरूस्त असले तरी ते धोकादायक नसल्याची ग्वाही या अधिकार्यांनी दिली आहे.
www.konkantoday.com