दारूच्या दुकानातील काम करणाऱ्या कामगाराने रोख रक्कम व दारूच्या बाटल्या असा अडीच लाखाचा ऐवज चोरून नेला

रत्नागिरी तालुक्यातील पाली बाजारपेठ येथील वैभव देशी दारूच्या दुकानात चोरीची घटना उघडकीस आली आहे. दुकानाचा कर्मचारी अशोक थोडु तारी ( मूळचा दगडु पवार चाळ नंबर २, रूम नंबर २२, स्वदेश मिल रोड, चुनाभट्टी, सायन, मुंबई ) याने दुकानातील रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या असा एकूण २ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेल्याचा आरोप आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी विनोद शांताराम रसाळ (वय ४५, व्यवसाय व्यापार, रा. पाली बाजारपेठ) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, संशयित अशोक तारी याने २ एप्रिल रोजी दिवसभर देशी दारूची विक्री करून आलेले २१ हजार रुपये आणि दुकानातील १८० मिलीच्या १२२६ नग संत्रा देशी दारूच्या सीलबंद बाटल्या (किंमत ९८ हजार ८० रुपये), ९० मिलीच्या १४४० नग सीलबंद बाटल्या (किंमत ५७ हजार ६०० रुपये) तसेच ७५० मिलीच्या १२ नग बाटल्या (किंमत ३ हजार ८४० रुपये) असा एकूण १ लाख ५९ हजार ५२० रुपयांचा दारूसाठा चोरला. याव्यतिरिक्त, आरोपीने जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ या दरम्यान विक्री केलेल्या देशी दारूची ७२ हजार ९८० रुपये इतकी रक्कम देखील स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेल्याचा आरोप आहे.अशा प्रकारे, आरोपी अशोक तारी याने दुकानातील एकूण ९३ हजार ९८० रुपये रोख रक्कम आणि १ लाख ५९ हजार ५२० रुपयांची दारू, म्हणजेच एकूण २ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा माल चोरून पलायन केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button