चिपळूण शहरातील गोवळकोट येथील जॅकलेलमधून अर्ध्या शहराला अनियमित पाणीपुरवठा.

चिपळूण शहरातील गोवळकोट येथील जॅकलेलमधून अर्ध्या शहराला होणारा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. यामुळे मंगळवारी पेठमाप येथील महिलांनी नगर परिषदेवर धडक देत प्रशासनाला जाब विचारला. यावर नदीला पाणी असेल तेव्हाच पाणी सोडले जाईल, ते कसे भरायचे ते तुमचे तुम्हीच ठरवा, असे बेजबाबदार उत्तर एका कर्मचार्‍याने दिल्याने जोपर्यंत पाणी वेळेत सोडत नाही तोपर्यंत पाणीपट्टी न भरण्याचा इशारा महिलांनी दिला.

शहराचा पाणीपुरवठा वाशिष्ठी नदीवर अवलंबून आहे. मात्र नदी बारमाही नसल्याने उन्हाळ्यात कोळकेवाडीतून वीजनिर्मितीनंतर सोडल्या जाणार्‍या पाण्यावर पाणी योजना चालतात. अर्धा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी खेर्डी-माळेवाडी येथे जॅकवेलजवळ बंधारा बांधला असल्याने येथे कायम पाणी असते. मात्र गोवळकोट जॅकवेल समस्यांच्या गर्तेत अडली आहे. त्यामुळे गोवळकोट, गोवळकोटरोड, पेठमाप, मुरादपूर, उक्ताड भागाला अनियमित पाणीपुरवठा होतो.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button