
राज्यातील ५४५ बस स्थानकांवर एकही सुरक्षा रक्षक नाही, सीसीटीव्ही, कॅमेरेही बंद.
एसटी महामंडळाच्या स्थानकावरील सुरक्षेचा मुद्दा पुण्यातील घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. महामंडळाची कोलमडलेली आर्थिक स्थिती, करावी लागत असलेली काटकसर यामुळे सुरक्षा व्यवस्थेच्या खर्चाला कात्री लावली जात आहे. पर्यायाने मध्यवर्ती ३२ स्थानके सोडली तर राज्यातील तब्बल ५४५ बस स्थानकांवर एकही सुरक्षा रक्षकही तैनात नाही.महामंडळाने फक्त मध्यवर्ती बस स्थानकासाठीच सुरक्षा रक्षकांची तरतूद केली आहे. अशी स्थानके जिल्हा मुख्यालय ठिकाणी आहेत. त्यातही एका बसस्थानकावर १८ पेक्षा जास्त सुरक्षा रक्षक नसावे. (अपवाद पुणे येथील स्वारगेट व शिवाजीनगर प्रत्येकी ३) ही अट आहे.
३२ मध्यवर्ती बसस्थानकांवर प्रत्येकी १८ यानुसार ५७६ व पुणे येथील दोन बस स्थानकांवर जादा दहा सुरक्षा रक्षक मिळून ५८६ जणांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. परंतु त्याहीपेक्षा कमी लोकांमध्ये काम भागविले जात आहे.एसटीचे सुरक्षा व दक्षता खाते कर्मचार्यांची वानवा असल्याने हतबल आहे. या विभागाला अधिकार्यांसह सहा काही ठिकाणी आठ पदे मंजूर असताना, केवळ तिघांवर काम ढललले जात आहे. यातही मूळ कामे सोडून त्यांच्यावर इतर प्रकारची जबाबदारी वाढवून देण्यात आलेली आहे.
राज्यात २५२ आगार आहेत, अशा ठिकाणी असलेल्या बसस्थानकांमध्ये सीसीटीव्ही लावले असल्याचे सांगितले जाते. मात्र यातील अनेक सीसीटीव्ही बंद असल्याचे समजते.लालपरीच्या ताफ्यात ५८० शिवशाही दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये एसी सोबतच कॅमेरेही होते. आज अनेक शिवशाही बसमधील कॅमेरे नादुरूस्त आहेत. काहींचे डिस्प्ले तुटलेले आहेत. तर काही गायब झालेले आहेत.www.konkantoday.com