मिरकरवाडा बंदरातील काही मच्छीमारांनी स्वतःहून हटवली बांधकाम

रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा बंदर येथील अनधिकृत बांधकामे हटविण्याबाबत मत्स्य विभागाने नोटीस बजावली आहे. ही बांधकामे मच्छीमारांनी स्वतःहून हटवावीत असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. ही सर्व अनधिकृत बांधकामे २६ जानेवारीपर्यंत हटवण्याची मुदत देण्यात आली असून, काही मच्छीमारांनी शनिवारी स्वतःहून बांधकामे हटवण्यास सुरुवात केली.

आज या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक निखिल पाटील, शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर, मत्स्य व्यवसाय अधिकारी आनंद पालव आणि प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय नागनाथ भादुले उपस्थित होते. मात्र, काही मच्छीमारांनी अजूनही बांधकामे हटवलेली नसल्याने सोमवारी प्रशासन ही बांधकाम हटविणार की, मच्छीमार स्वतःहून बांधकामे बाजूला करणार हेच आता पाहायचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button