
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ‘घर घर संविधान’ उपक्रम.
रत्नागिरी, दि. 24 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ‘घर घर संविधान’ उपक्रमांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभागाच्यावतीने प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना संविधानाची प्रत देवून संविधानाचा जागर करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहणानंतर संविधाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात येणार येवून संविधान जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त सन २०२४-२५ पासून या अमृत महोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ घर घर संविधान कार्यक्रम साजरा करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.000