
एकनाथ शिंदे यांच्या मनात चालले तरी काय? थेट गावाला पोहोचले.
महायुतीत रस्सीखेच सुरु असताना शिंदे, फडणवीस व अजित पवार गुरुवारी दिल्लीला चर्चेसाठी गेले होते. तिथून परतताच एकनाथ शिंदेंनीमहायुतीच्या चर्चेच्या सर्व बैठका रद्द करून साताऱ्यातील मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार शिंदे दरेमध्ये पोहोचले असून त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जेव्हा राज्यात काही अडचणीची स्थिती निर्माण होते.
याशिवाय राजकीय उलटफेर सुरु असतात. त्यावेळी या भाऊगर्दीतून एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे या गावी दाखल होतात. त्यांना येथे शांतता आणि समाधान मिळते. शिवाय शेताकडे आल्यानंतर वेगळी ऊर्जा मिळत असते. त्यामुळे ते याठिकाणी येथे पसंत करतात. आत्तापर्यंत साधारणत: सहा ते सात वेळाअडचणीच्या काळात गावाकडे आले आहेत. याप्रमाणे शिंदे आजही गावी आले आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सध्या चर्चा सुरूच आहे. याच अनुषंगाने शुक्रवारी दिल्लीत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक झाल्यानंतर शनिवारी मुंबईतही बैठक होती. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे, ता. महाबळेश्वर गावी दोन दिवसांच्या मुक्कामी आल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. दरे गावात दाखल झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी न बोलता शिंदे थेट घरी गेले. यामुळे शिंदे यांच्या मनात चाललंय तरी काय याची उत्सुकता वाढली आहे.